भारतीय नौकानयनाचा इतिहास हे पुस्तक प्राचीन काळ, मराठा आरमार व पेशवाईनंतरचा स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा काळ अशा तीन विभागात आहे.
वैदिक ग्रंथ, महाभारत,रामायण, जातककथा, मौर्यकाल, कौटिल्य अर्थशास्त्र अशा प्राचीन काळातील उल्लेख पहिल्या विभागात नोंदविले आहेत.
दुसऱ्या विभागात विजयनगर पाडावानंतर झामोरीन व त्याचे नौसेनानी, शिवाजी महाराजांची आरमार स्थापना, आंग्रे, धूळप यांचा उत्कर्ष व विनाश, शिवाजीमहाराजांची सागरी मोहीम, नौका बांधणी, आरमाराचा पगार या गोष्टी दिलेल्या आहेत.
इ.स.१८१८ मध्ये पेशवाईच्या शेवटानंतर ब्रिटिशांनी बॉम्बे मरीन्सची कशी वाढ केली, वाडिया मास्टर, सिंदिया स्टीम कंपनी व ब्रिटीश यांच्यातील संबंध, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धातील भारतीय नौसैनिकांचा पराक्रम, मुंबई बंदरातील स्फोट व भारतीय नौसैनिकांचे बंड या इतिहासाने तिसरा विभाग संपन्न होतो. तसेच नौकानयनाच्या आधुनिक काळातील साधनांचा विकास या विभागाच्या शेवटी लेखक द. रा. केतकर यांनी दिलेला आहे.
₹320.00
Bharatiya Naukanayanacha Itihas – भारतीय नौकानयनाचा इतिहास
Bharatiya Naukanayanacha Itihas gives detailed history of Navy and is divided into three sections, Ancient period, Maratha Armar and from end of Peshwai till 1947. This book gives interesting information of Bombay Marines, Sindia Steams, Wadia Masters during the era of British written Dattatray R. Ketkar.
In stock
Weight | 350 g |
---|---|
Dimensions | 14 × 2 × 21.5 cm |
First Edition | 14/Apr/2019 |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 296 |
ISBN | 978-81-933412-7-8 |
Also available at | https://www.amazon.in/Bharatiya-Naukanayanacha-Itihas-D-R-Ketkar/dp/8193341279 |